3. भारतातील स्थानांतरीत लोकसंख्येच बाबतीत खालील पैकी कोणते विधान/ने योग्य आहे/आहेत ?
अ) भारतातील 25% गरीब लोकसंख्या शहरात राहते.
ब) भारतातील शहरी ते शहरी व शहरी ते ग्रामीण स्थानांतरे लोकसंख्येपेक्षा ग्रामीण ते शहरी लोकसंख्येचे स्थानांतर प्रमाण जास्त आहे.
क) भारतातील स्थानांतरीत होणा-या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार शहरी केंद्रे कोलकत्ता, मुंबई दिल्ली अशी आहेत.
ड) भारतातंर्गत सर्वात जास्त लोकसंख्येचे स्थानांतर विवाहामुळे होते.
(राज्यसेवा मुख्य ,2012)
बरोबर उत्तर: पर्याय - अ, ब आणि ड
* अ हे विधान योग्य आहे कारण 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील सुमारे 30% गरीब लोकसंख्या (जी उत्पन्नाच्या इतर स्त्रोतांच्या अभावी शहराकडे वळते) शहरात राहते.
* ब हे विधान योग्य आहे कारण भारतात ग्रामीण ते शहरी स्थानांतराचे प्रमाण शहरी ते ग्रामीण किंवा शहरी ते शहरी स्थानांतराच्या तुलनेत जास्त आहे.
* क हे विधान चुकीचा आहे कारण शहरी स्थानांतराच्या उतरत्या क्रमाने पाहता दिल्ली, मुंबई आणि कोलकाता अशी शहरी केंद्रे आहेत.
* ड हे विधान योग्य आहे कारण विवाह हा भारतातील स्थानांतरीत होणाऱ्या लोकसंख्येचा एक प्रमुख घटक आहे.